Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    भाजप नेत्याच्या कारखान्याकडे ऊस बील थकलं, आक्रमक शेतकऱ्यांचं शोले स्टाइल आंदोलन

     


    भाजप नेत्याच्या कारखान्याकडे ऊस बील थकलं, आक्रमक शेतकऱ्यांचं शोले स्टाइल आंदोलन, 


    उस्मानाबाद : भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल साखर कारखान्या विरुध्द शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी पेट्रोल भरलेल्या बाटल्यांसह पाण्याच्या टाकीवर आंदोलन केलं. लोहारा तालुक्यातील होळी येथील शेतकऱ्यांनी भाजपाचे माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल कारखान्याविरोधात आंदोलन सुरु केले आहे. शेतकरी हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन होळी येथील पाण्याच्या टाकीवर चढले होते. २० ते २५ शेतकऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं. पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं असून उद्या चर्चेनंतर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

    लोहारा तालुक्यातील होळी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लोकमंगल कारखान्याला ऊस दिला होता. लोकमंगल कारखान्याने ऊस दर दोन हजार रुपयांप्रमाणं दिला होता. त्यामुळे उर्वरीत ५०० रुपये द्यावेत या मागणीसाठी होळी येथील शेतकऱ्यांनी अनेकवेळा कारखाना प्रशासनास निवेदन दिले होते. तसेच यापूर्वी कारखाना स्थळी आंदोलन केले होते. यासंदर्भात आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांनी निवेदन दिले होते. त्यात उर्वरित ५०० रुपये देण्यात यावे, अशी मागणी केली होती.

    ५ जानेवारी पर्यंत कोणताही निर्णय झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सर्व शेतकऱ्यांनी आज सकाळी आंदोलनास सुरुवात केली होती. शेतकरी हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन होळी येथील पाण्याच्या टाकीवर चढले होते. या आंदोलनात संजय मनाळे, केशव सरवदे, व्यंकट माळी, पांडुरंग जाधव, दत्तू भोसले, अमोल गायकवाड, प्रवीण मोरे, संजय जाधव, प्रियेश जाधव, भुजंग मोरे, शिवाजी पवार, अनिल गायकवाड, माधव पाटील, मारुती जाधव, किसन पाटील, अमोल शिंदे, ज्ञानेश्वर गवळी, दत्तू गिरी, मधुकर बिराजदार, व्यंकट जाधव सहभागी झाले आहेत.

    आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी होळी येथे लोहारा येथील लोकमंगल कारखाण्याच्या विरुध्द वाढीव ऊस दरा बाबत आंदोलन केले होते. सायंकाळी ५ वाजता लोहारा पोलीस निरिक्षक यांनी शेतकऱ्या बरोबर चर्चा केली. उदया लोकमंगल समुहातील वरिष्ठ अधिकारी किंवा संचालक चर्चासाठी येणार असून उदया निर्णय होईल आज आम्ही आंदोलन स्थगित केले आहे, अशी माहिती शेतकरी केशव सरवदे यांनी दिली.

    शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात उदया सोलापूर येथील मुख्य कार्यालयातून वरिष्ठ अधिकारी किंवा संचालक हे शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी जाणार आहेत. जो काही निर्णय होईल तो उदया होईल ,असे लोकमंगल समुहाकडून सांगण्यात आलय 

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad