Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    बार्शीतील निर्भयाची मृत्यूशी झुंज...

     



    बार्शीतील निर्भयाची मृत्यूशी झुंज...


    सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत ५ मार्च रोजी रात्री बारावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीवर अत्याचार करण्यात आला होता. संशयित आरोपींना वेळीच अटक न केल्याने संशयित दोघां आरोपींनी पीडित मुलीच्या घरी जाऊन तिच्यावर कोयत्याने वार केला. तिच्या डोक्यावर, हातावर गंभीर वार केले. या हल्ल्यात पीडित बार्शीतील निर्भयावर सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पीडित तरूणीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, माझ्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. हल्ल्यात विद्यार्थीनीच्या डोक्यावर भयंकर अशा जखमा झाल्या आहेत. अतिदक्षता विभागात मृत्यूच्या दारात शेवटच्या घटका मोजत आहे.

    अत्याचार झालेल्या पीडित मुलीच्या आईने माहिती देताना सांगितले, अक्षय विनायक माने (वय २३ वर्ष), नामदेव सिद्धेश्वर दळवी (वय २४ वर्ष, दोघे रा. बाळेवाडी, ता बार्शी जिल्हा सोलापूर) या दोघांची मोठी दहशत आहे. बार्शी पोलिसांनी वेळीच या नराधमांना अटक केली असती तर, माझ्या मुलीवर हा हल्ला झाला नसता. काही राजकीय नेत्यांचा सुद्धा या संशयित आरोपींना पाठिंबा असल्याची माहिती पिडीतेच्या आईने दिली आहे.

    बार्शी पोलीस दलातील चार पोलीस सस्पेंड

    पीडित विद्यार्थीनीची फिर्याद न घेतल्याने आणि संशयित आरोपींना वेळेत अटक न केल्याने पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या आदेशानुसार चार पोलिसांना निलंबित करण्यात आले. एपीआय महारुद्र परजणे, बार्शी तालुक्यातील पीएसआय राजेंद्र मंगरुळे, डब्ल्यूपीएसआय सारिका बजरंग गुटकुल, बार्शी शहरचे अरुण हेड कॉन्स्टेबल भगवान माळी अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत. कर्तव्यात कसूर करणे, गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक न करणे असे कारण समोर करत कारवाई झाली आहे. कर्त्यव्यात कसूर करणाऱ्यावर अशीच कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडावे. हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई करणार असल्याचे महानिरीक्षक फुलारी यांनी सांगितले.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad