खंडणी मागण्यासाठी हजारो सिमकार्डचा वापर, लोकेशन न कळण्यासाठी आरोपींची शक्कल
खंडणी मागण्यासाठी हजारो सिमकार्डचा वापर, लोकेशन न कळण्यासाठी आरोपींची शक्कल
नांदेड: खंडणीसाठी टोळीकडून आता सिमकार्ड एक्सचेंज प्रणालीचा वापर केला जातं आहे. असाच काहीसा प्रकार नांदेड पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी पोलिसांनी केरळ आणि कर्नाटक राज्यातून तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून १० सिमबॉक्स, १ हजार २४४ सिम कार्ड, राउटर आणि लॅपटॉप जप्त करण्यात आहेत. विशेष म्हणजे या अंतराज्य टोळीच्या म्होरक्याला दुबईहुन परतताच अटक केली आहे. सियाबुद्दीन अब्दुल रहेमान, जयश अशोक बेटकर ( रा.दांडेली.जि. कारवार, कर्नाटक ), राशीद अब्दुल अजीज नोटटानवीडन ( रा.कटाडी मातेडम, जि. मल्लम पूर, केरळ ) अशी अटक केलेल्या टोळीतील आरोपींची नावे आहेत.
या टोळीने चार महिन्यांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एका व्यापाऱ्याला खंडणी मागितली होती. आरोपी एक दोन नव्हे तर दहा वेळा वेगवेगळ्या सिमद्वारे व्हीओआयपी कॉल करत होते. पोलिसांना लोकेशन मिळू नये म्हणून टोळीकडून व्हीओआयपी कॉलचा वापर केला जायचा. या प्रकरणी व्यापाऱ्याने पोलिसांकडे तक्रार केली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला, मात्र जो व्हीओआयपी कॉल आला होता, त्याचे एका एका मिनिटात लोकेशन बदलून वेगवेगळ्या राज्यात दाखवत होते त्यामुळे पोलिसांसमोर एक प्रकारे आव्हान बनले होते.
पोलिसांनी लोकेशनच्या आधारावर छत्तीसगड, बिहार, कर्नाटक, केरळ आदि राज्यात जाऊन तपास केला. अखेर पोलिसांनी या गुंतागुंतीच्या तपासाचा छडा लावला आणि सियाबुद्दीन अब्दुल रहेमान, जयश अशोक बेटकर, राशीद अब्दुल अजीज नोटटानवीडन याला अटक केली. या टोळीतील मुख्य आरोपी राशीद अब्दुल अजीज नोटटानवीडन हा दुबईला पळून गेला होता. दुबईहुन केरळला परतताच नांदेड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या
धक्कादायक बाब म्हणजे या टोळीकडून खंडणीसाठी सिमबॉक्सचा वापर केला जायचा आणि त्यानंतर व्हीओआयपी कॉलला जीएसएम मध्ये कन्व्हर्ट केला जातं होता. कर्नाटक राज्यातील दांडेली आणि केरळ राज्यातील मल्लमपुरम येथून ही आपले कारनामे करत होती. या टोळीत आणखी किती जण आहेत आणि या टोळीने किती जणांना फसवले आहे याचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.
धक्कादायक बाब म्हणजे या टोळीकडून खंडणीसाठी सिमबॉक्सचा वापर केला जायचा आणि त्यानंतर व्हीओआयपी कॉलला जीएसएम मध्ये कन्व्हर्ट केला जातं होता. कर्नाटक राज्यातील दांडेली आणि केरळ राज्यातील मल्लमपुरम येथून ही आपले कारनामे करत होती. या टोळीत आणखी किती जण आहेत आणि या टोळीने किती जणांना फसवले आहे याचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.

No comments