नवे सरकार कोणाचे? राज्यातील या ३७ जागा ठरवणार
नवे सरकार कोणाचे? राज्यातील या ३७ जागा ठरवणार
मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक जागेवर जोरदार चुरस सुरू आहे. विजयासाठी प्रत्येक उमेदवार सर्व काही करण्याचा प्रयत्न करतोय. निवडणुकीतच्या प्रचारातील भाषा हा काळजीचा विषय ठरत चालला आहे. अशात 'बंटेंगे तो कटेंगे' सारखे वक्तव्य होत आहेत. राज्यातील निवडणुकीत ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी होत आहे. या दोघांशिवाय अन्य काही पक्ष देखील रिंगणात आहेत. राज्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत ३७ जागा अशा होत्या येथे जय-पराजयाचे अंतर ५ हजारपेक्षा कमी होते.
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांपैकी पाच जागा अशा होत्या ज्यात विजयाचे अंतर १ हजार पेक्षा कमी मतांचे होते. एक जागा तर अशी होती येथे विजयाचे अंतर ५०० पेक्षा कमी होते. हा विजय शिवसेनेच्या भाऊसाहेब लांडे यांनी मिळवला होता. चांदीवली मतदारसंघातून त्यांनी फक्त ४०९ मतांनी विजय मिळवला होता.
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांपैकी पाच जागा अशा होत्या ज्यात विजयाचे अंतर १ हजार पेक्षा कमी मतांचे होते. एक जागा तर अशी होती येथे विजयाचे अंतर ५०० पेक्षा कमी होते. हा विजय शिवसेनेच्या भाऊसाहेब लांडे यांनी मिळवला होता. चांदीवली मतदारसंघातून त्यांनी फक्त ४०९ मतांनी विजय मिळवला होता.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोगरा मतदारसंघातून चंद्रिकापुरे गोवर्धन यांनी ७१८ मतांनी विजय मिळवला होता. तर पुण्यातील दौंडमधून राहुल कुल यांनी ७४६ मतांनी बाजी मारली होती. असाच विजय सांगोलामधून शाहजी बापू पाटील यांनी मिळवला होता, त्यांनी ७६८ मतांनी विजय मिळवला. नगरमधील कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशितोष काळे यांनी ८२२ मतांनी बाजी मारली होती.
या शिवाय एक दो दोन हजार मतांच्या फरकाने भिवंडी पूर्व, मूर्तिजापूर, मुक्ताईनगर आणि बीड येथील निकाल लागले होते. या मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी, सपा आणि अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. २०१९ साली २८ जागा अशा होत्या येथे विजयाचे अंतर २ ते ५ हजार इतके होते. यातील १२ जागांवर भाजपने, ६ जागांवर राष्ट्रवादी, ४ जागा काँग्रेस, २ जागा शिवसेना तर एआयएमआयएम, बहुजन विकास आघाडी, भाकप यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली होती. एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळाली होती.
निवडणुकीत ३१ जागा अशा होत्या येथे विजयाचे अंतर ५ हजार पेक्षा कमी होते. या ३१ पैकी १६ मतदारसंघात माहविकास आघाडीने लीड घेतले होते तर १५ जागांवर महायुतीला आघाडी मिळाली होती. या निकालाकडे पाहिले तर ३७ जागांवर कोण बाजी मारणार यावर सत्ता कोणाला मिळेल याचा फैसला होऊ शकतो.
निवडणुकीत ३१ जागा अशा होत्या येथे विजयाचे अंतर ५ हजार पेक्षा कमी होते. या ३१ पैकी १६ मतदारसंघात माहविकास आघाडीने लीड घेतले होते तर १५ जागांवर महायुतीला आघाडी मिळाली होती. या निकालाकडे पाहिले तर ३७ जागांवर कोण बाजी मारणार यावर सत्ता कोणाला मिळेल याचा फैसला होऊ शकतो.
No comments