Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    गुजरातमध्ये भाजपची विजयी आघाडी, पण बीडमध्ये मोठा पराभव

     


    गुजरातमध्ये भाजपची विजयी आघाडी, पण बीडमध्ये मोठा पराभव


    बीड : जिल्ह्याच्या राजकारणात मुंडे विरुद्ध मुंडे या भावंडांमधील संघर्ष कायमचं टोकाचा राहिला आहे. स्थानिक निवडणुका असो की विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यातील संघर्ष प्रत्येक निवडणुकीत पाहायला मिळतो. अशातच आता बीड जिल्ह्याच्या राजकाणात महत्त्वाची मानली जाणारी 'पांगरी' गावची ग्रामपंचायत दुसऱ्यांदा धनंजय मुंडे यांच्या ताब्यात गेली आहे. पंकजा मुंडे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

    राज्यासह बीड जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचं वारं वाहत आहे. बीड जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. उमेदवारी मागे घेण्याचा काल अंतिम दिवस होता. याच दिवशी जिल्ह्याच्या राजकाणात महत्त्वाची मानली जाणारी 'पांगरी' ही ग्रामपंचायत दुसऱ्यांदा धनंजय मुंडे यांच्या ताब्यात गेली आहे. पांगरी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आणि दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मृतिस्थळ गोपीनाथ गड आहे.
    धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष वाल्मिकराव कराड यांच्या प्रयत्नाने पांगरी ग्रामपंचायतीच्या ११ जागांपैकी १० जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. यामध्ये सरपंच पदी सुशिल वाल्मिकराव कराड यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. या निकालानंतर परळीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत सुशिल कराड यांना जल्लोषात शुभेच्छा दिल्या. २०१७ सालीही ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्याकडून जिंकली होती. यापूर्वी राज्यात जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२२ या दरम्यानच्या कालावधीत मुदत संपलेल्या २०५३ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या ३४ जिल्ह्यांमधील ३४० तालुक्यांतील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र यामध्ये पांगरी या ग्रामपंचायतीकडे दोन बडे नेते आमने-सामने असल्याने सगळ्यांचाच लक्ष होतं. मात्र ११ जागांपैकी दहा जागा बिनविरोध आल्याने या ग्रामपंचायतीवर धनंजय मुंडे यांचं पुन्हा एकदा वर्चस्व आलं आहे. धनंजय मुंडेंच्या गटाने पंकजा मुंडे यांच्या गटावर केलेली ही मात कुठेतरी पुढील राजकारणावर कारणीभूत ठरेल का किंवा या निवडणुकीचा पुढच्या काही काळात राजकीय पटलावर काही प्रभाव राहील का अशा एक ना अनेक चर्चांना देखील राजकीय पटलावर आणि कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाल्याचे पाहायला मिळतंय.
    ग्रामपंचायत निवडणूक छोट्या प्रमाणात पाहण्याचा दृष्टिकोन आता मोठ्या लेवलला गेल्याचा या निवडणुकांमधून पाहायला मिळतंय आता ग्रामपंचायतीचा पंकजा मुंडेंवर कोणत्या प्रकारे प्रभाव पडणार किंवा राजकारणात या नवीन काही पैलूंना पंकजा मुंडे हात घालणार का? येणारा काळच पाहायला मिळेल. मात्र या बहिण-भावाच्या प्रत्येक छोट्या असो वा मोठ्या निवडणुकीकडे पूर्ण बीड जिल्हा सहित महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं. आता हा पहिला धक्का धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांनी दिला आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad