Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    अख्या गावाला वाटते मृत्यूची भीती



    अख्या गावाला वाटते मृत्यूची भीती

     बीड : बीड शहरातल्या वैभवात भर टाकणारी नदी म्हणजे बिंदुसरा. काही वर्षांपूर्वी हीच नदी बीड शहर वासियांसाठी जीवनदायी ठरत होती, मात्र बीडच्या नगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराने आणि आत्तापर्यंत सत्ता भोगत आलेल्या राजकीय पुढार्‍याने बीडच्या बिंदुसरा नदीचा नाला झाला आहे. हीच नदी बीड शहराच्या मध्य भागातून अनेक गावांना मिळते. त्याशिवाय बीडपासून जवळच असलेल्या शिदोड नावाच्या गावात देखील ही नदी वाहते. मात्र या नदीत असं काही सापडलं, की नदीमुळे आमचा जीव धोक्यात आला आहे, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.


    बीड शहरामधून जाणारी बिंदुसरा नदी ही जवळच असलेल्या शिदोळ गावातून जाते. या बीड शहर ते शिदोड या दोन्हीच्यामध्ये एमआयडीसी विभाग आहे. याच ठिकाणी अनेक कारखाने देखील पाहायला मिळतात. मात्र या कारखान्यातून निघणारं विषारी पाणी या बिंदुसरा नदीत सोडलं जात आहे. कारखान्यातील पाणी नदीत सोडल्यामुळे बिंदुसरा नदीतील अनेक मासे शिदोड गावाजवळ मृत अवस्थेत आढळले आहेत. यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हेच पाणी पुढे जमिनीत मुरल्याने विहीर आणि बोअरवेलद्वारे नागरिकांना पोहोचतं. या विषारी पाण्यामुळे मासे मरत असतील तर माणसांचं काय होईल अस संतप्त सवाल गावकऱ्यांकडून विचारला जात आहे.

    गेल्या अनेक वर्षांपासून बीडच्या बिंदुसरा नदीची दैना झाली आहे. बीड शहरातील नागरिकांचा सगळा कचरा नगरपालिकेकडून नदीमध्ये सर्रास टाकला जात आहे. मात्र पुढे येणाऱ्या संकटाची भीती नगरपालिकेला किंवा नागरिकांना नसल्याचं दिसतं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा, कारखान्यातील पाणी हा एखाद्याचं आयुष्य किंवा गावही उध्वस्त करू शकतं, त्याचा एक छोटासा नमुना या शिदोड गावात पाहायला मिळाला.

    बीड शहराच्या एमआयडीसीतील प्रक्रियेमध्ये वापरली जाणारी अनेक विषारी द्रव्य या नदी पात्रात सोडली जातात. मात्र याकडे दुर्लक्ष केलं जात असून नदीचा नाला झाला आहे. एमआयडीसी भागातील अनेक कंपन्या त्यांच्या कंपन्यातून निघणारं दूषित पाणी या नदीमध्ये सोडत आहेत. या बिंदुसरा नदीच्या मार्गावर कित्येक गावं असतील, ज्या गावातून हे विषारी पाणी बिंदुसरा नदीतून पुढे जात आहे. आता गावकऱ्यांच्या या समस्येवर, या भीतीवर कोण पर्याय काढणार का? बीड जिल्ह्यातील नगरपालिका किंवा बीड प्रशासन या गंभीर गोष्टीकडे लक्ष देणार का? याकडे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad