मोबाइलचा नाद लय बेक्कार; हातात फोन असल्याचा समज करुन घेत तरुणाची १० किमी पायपीट; पुढे घडलं...
मोबाइलचा नाद लय बेक्कार; हातात फोन असल्याचा समज करुन घेत तरुणाची १० किमी पायपीट; पुढे घडलं...
लातूरः शिक्षणाचा पॅटर्न म्हणून लातूरची ओळख आहेच पण एक शांत शहर म्हणूनही लातूरकरकडे आदराने पाहिले जाते. त्यामुळे राज्यभरातून विद्यार्थी लातूर शहरात शिक्षण घेण्यासाठी येतात. बीड जिल्ह्यातील एका कुटुंबातील एक मुलगी आणि मुलगा लातूर शहरात शिक्षण घेण्यासाठी आले. ते वेगवेगळ्या वसतिगृहात राहून शिक्षण घेत होते. घरापासून दूर पर जिल्ह्यात वसतिगृहात राहत असल्याने पालकांनी दोघांनाही संपर्कासाठी आणि ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल घेऊन दिला. मात्र, मोबाइलच्या अतिवापरामुळं अल्पवयीन मुलाने जे केलं ते ऐकून पालकांनाही धक्काच बसला आहे.
आपला लहान भाऊ मोबाईलच्या अधिकच आधीन होत असल्याचे बहिणीच्या लक्षात येऊ लागले. तिने लहान भावाला अनेक वेळा समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो तिच्याकडेही दुर्लक्ष करू लागला. त्याच्या वाढत जाणाऱ्या मोबाईल वापराने ती चिंतेत पडली. अखेर भावाजवळचा मोबाईल घ्यायचा असं तिने ठरवलं. बहिणीने मोबाईल काढून घेतला. याचा राग लहान भावाला आला. दोघांमध्ये थोडी कुरबुर झाली.
मात्र, सायंकाळी लहान भाऊ वसतिगृहात परतला नाही. म्हणून घाबरलेल्या बहिणीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. पण कोणाला काहीच माहीत नव्हते. वसतीगृह चालकांनी पण अगोदर त्या मुलाचे मित्र, नातेवाईक यांच्याकडे शोध घेऊन नंतर पोलिसांशी संपर्क करण्याचा विचार केला.
मात्र, सायंकाळी लहान भाऊ वसतिगृहात परतला नाही. म्हणून घाबरलेल्या बहिणीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. पण कोणाला काहीच माहीत नव्हते. वसतीगृह चालकांनी पण अगोदर त्या मुलाचे मित्र, नातेवाईक यांच्याकडे शोध घेऊन नंतर पोलिसांशी संपर्क करण्याचा विचार केला.
दरम्यान, हा अल्पवयीन मुलगा आपल्या हातात मोबाईल आहे आणि आपण तो हाताळत आहोत अशा समजुतीने रस्त्याने चालत राहिला तो रात्री ११ वाजण्याच्या सुमारास लातूरपासून १० किमी अंतरावर असलेल्या ममदापूर येथील मांजरा नदीच्या पुलाजवळ रेणापूर येथील नगरसेवकांना दिसला. मात्र इथलं जवळच्या गावातील कोणी असेल असे अमजून ते रेणापूर निघून गेले. परत दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर ते काही कामानिमित्त लातूरला निघाले. त्या पुलाजवळ कोणी मुलगा झोपला असल्याचे त्यांना दिसले. त्यांना रात्रीचा प्रसंग आठवला आणि त्यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी त्या मुलाला उठवले आणि विचारपूस केली.
नगरसेवकांनी विचारपूस केली असता भावाने सर्व हकीकत त्यांना सांगितली. त्यानंतर ते तातडीने मुलाला घेऊन ते लातूरला शिवाजी नगर पोलीस ठाण्यात पोहचले. पोलिसांनी त्या मुलाच्या बहिणीला संपर्क केला आणि तिच्या भावाला तिच्या बहिणीच्या स्वाधीन केलं. शिवाजी नगर पोलिसांना या घटनेसंदर्भात संपर्क केला असता त्यांनी या घटनेला त्यांनी दुजोरा दिला आहे. पोलीस ठाण्यात या संदर्भात नोंद करण्यात आली आहे पण तक्रार नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले.
No comments