तरुण पिढीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा
- अनमोल सागर
· जिल्हा परिषदेमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
लातूर दि. 19 (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल प्रशासक, युद्धनीती, राजनीती निपुण असे आदर्श लोककल्याणकारी राजे होते. आजच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महारज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. कार्यक्राची सुरुवात महाराष्ट्र राज्य गीताने झाली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण जावेद शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे, कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोष नाईकवाडे, उप शिक्षण अधिकारी श्री. पवार, प्रशासन अधिकारी श्री. बादणे, रामकिशन फड, संतोष माने यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी शाहिर धम्मपाल सांवत व संच यांनी पोवाडा आणि शिवगीते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संवादतज्ज्ञ उध्दव फड यांनी केले.
No comments:
Post a Comment