शेतकऱ्याच्या मुलीने इयत्ता दहावी मध्ये 94 टक्के गुण घेतले ....
भिसे वाघोली येथील कुमारी स्नेहा शिवाजी वायाळ हिने इयत्ता दहावी मध्ये 94% गुण घेऊन आई-वडिलांचे व भिसे वाघोली गावाचे नावलौकिक केले त्याबद्दल आज रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला या मुलीला इंजिनियर व्हायचे आहे आणि निश्चितच भिसे वाघोली मधून अगदी ग्रामीण भागामधून भगतसिंग विद्यालयामध्ये शिक्षण घेऊन दहावी मध्ये 94 टक्के गुण मिळवणे म्हणजे खूप नवलच ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांच्या मुलीने या प्रकारे यश संपादन केले त्यामुळे त्याचा सत्कार करण्यात आला आणि तसेच त्याच्या पुढील आयुष्यासाठी भवितव्यासाठी लाख लाख आशीर्वाद देण्यात आले याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट चे किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष नवनाथ शिंदे भिसे वाघोली येथील भाजपाचे तालुका उपाध्यक्ष आणि समाजसेवक योगीराज साखरे व महादेव मांदळे मुलीचे आई-वडील आजोबा इत्यादी हजर होते
No comments:
Post a Comment