दुःखमुक्त माणूस निर्माण करण्याचे आव्हान साहित्यिकांनी स्वीकारावे जी.जी.कांबळे यांच्या पाच पुस्तक प्रकाशनात डॉ.श्रीपाल सबनीस यांचे आवाहन
दुःखमुक्त माणूस निर्माण करण्याचे आव्हान साहित्यिकांनी स्वीकारावे
जी.जी.कांबळे यांच्या पाच पुस्तक प्रकाशनात डॉ.श्रीपाल सबनीस यांचे आवाहनलातूर,दि.९ः जाती व्यवस्था,ब्राम्हणी व्यवस्थाही ही विष आहेच,त्याचा धिक्कार झालाच पाहिजे,तथापि ब्राम्हणी विचारांचा विरोध करणारे बहुसंख्य घटकही संविधानाप्रती किती सजग आहेत,संविधानप्रेमी आहेत,असा रोकडा सवाल करत त्यांच्यात भरलेले क्रौर्य आजही बहुजांनातील घटकांवर अन्याय अत्याचार होताना प्रकर्षाने दिसून येतेय,जीवंत माणसांना जनावरांच्या गोठ्यात जेवण देतात,अशी नेमका विरोधाभास टिपत,विज्ञाननिष्ठ समाज निर्माण करण्याबरोबरच ,ईश्वर,निरीशवरवादापेक्षा मानवाचेे कल्याण महत्वाचे असल्याने,साहित्यिकांनी बुध्द,कबीर,छ.शिवराय,तुकोबाराय,
कथाकार जी.जी.कंाबळे यांच्या वावर प्रकाशन प्रकाशित,निवडुंगाचे काटे या आत्मचरित्रासह,खुशी,दुरुडी,डा
पुढे बोलताना डॉ.सबनीस म्हणाले की,आजपर्यंत आलेल्या दलित आत्मकथनापेक्षा जी.जी.कांबळे यांच्या निवडुंगाचे काटे मध्ये अत्यंत संयमीपणा,विज्ञानवाद,कथाकथन,अं
जी.जी.कांबळे हे प्र.ईं.च्या परंपरेचे पाईक आहे,त्यांचे आत्मचरित्र म्हणजे विज्ञाननिष्ठा, प्रबोधन,व्यसनमुक्ती,माणूसकीचा ठेवा आहे,आत्मचरित्र म्हणजे साठ ते सत्तर वर्षांच्या सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक अनुभवाचा एक दस्ताऐवजच असतो,स्वाभीमानी माणूस प्रतिकुलतेवर मात करुन पुढे जातो,यांचे प्रत्यंतर येथे येते,असे सांगून,आज समाजाला तोडण्याची भाषा होतेय,याचा विचार करावा लागेल असे मत डॉ.जयद्रथ जाधव यांनी व्यक्त केले.
पांढरं भूत कथासंग्रहातून खाउजा धोरणाच्या स्वीकारानंतर आरक्षण डावलणे,नात्यातला हरपलेला ओलावा,अंधश्रध्दा,विनाअनुदान शिक्षण,कर्मकांड, वृध्दाश्रम,गावाविषयीची तळमळ आदींचा लेखाजोखा मांडलेला आहे,असे विचार डॉ.गणेश लहाने यंानी मांडले.
शासकीय योजनांचा लाभ गरजूंपर्यंत मिळत नाही,गायकवाड गुरुजी प्रकाशला प्रोत्साहन देवून डॉक्टर बनवितात,गोष्टी वाचून संस्कार घडतात.मनोरंजनासोबतच ंसंस्कार करणारी दुरुडी लघुकादंबरी आहे, तर खेड्यातील जातव्यवस्थेचे भोग,महिलांचे,दलितांचे प्रश्न,खास्ता खाणारी महिला हार न मानता भ्रष्ट गोष्टीला विरोध करणारी खुशी कांदबरी असल्याचे डॉ.संगीता सांगोले यांनी नमुद केले.
निवडुंगाचे काटे हे दखलपात्र आत्मचरित्र ठरले आहे,नकारासोबत संयम पानापानांवर दर्शवितो असे सांगून डॉ.भास्कर बडे यांनी अध्यक्षीय समारेाप केला.लेखक जी.जी.कांबळे यांनी लेखनामागणी भूमिका विषद केली. प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यंाच्या प्रतिमेस अभिवादन,दीपप्रज्वलनानंतर मान्यवराचे व परिश्रमींचे शाल,स्मृतीचिन्ह,ग्रंथ भेट देवून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य डॉ.दुष्यंत कटारे यंानी केले,सुभाष मस्के यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी मोहन कांबळे सेलूकर,आर.बी.राजेगावकर,प्रदीप कांबळे, अशोक सूतार, हरिभाऊ कोनाळीकर,उत्तम गायकवाड,चित्रकार दत्ता वालेकर,राहूल कांबळे,ऍड.अण्णाराव कांबळे, दिलीप गायकवाड,पूजा कंाबळे, विमल मदने,ज्योती कांबळे,श्रावण मस्के,रेखा कांबळे, विठ्ठल जाधव,कैलास कांबळे, सी.आर.बनसोडे, अशोक सुतार, डॉ.दयानंद कुटवाडे, शिला बरुरे, चंद्रकांत कल्याणी, अर्जून सोनाळे, प्रभाकर गोविंदवाड, तानाजी कुंभार, मोहन बिडवे,बाळ होळीकर,डी.एस.नरसिंगे,मस्के, वीरकर आदिंनी सहकार्य केले.या कार्यक्रमाला ग्रंथमित्र पांडुरंग अडसुळे,डॉ.एस.एस.कुलकर्णी, रमेश हणमंते,प्रकाश घादगिणे,शिवाजी साखरे वाघ यांच्यासह असंख्य साहित्यप्रेमी उपस्थित होते.
No comments