Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    बीडचं अनोख्या लग्न सोहळ्याद्वारे पुढचं पाऊल

     


    बीडचं अनोख्या लग्न सोहळ्याद्वारे पुढचं पाऊल


    बीड: बीड जिल्ह्यात सलग सहाव्यांदा पार पडला एचआयव्हीबाधित वधू-वरांचा विवाह सोहळा पार पडला आहे. विहांग प्रकल्प आणि व्यापारी महासंघाचे संतोष सोहनी यांच्या अथक प्रयत्नातून 21 जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडला आहे. बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे त्यासोबतच पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर तर संत महंत यासोबत मौलवी आणि बौद्ध धम्मातील भन्ते यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या थाटात पार पडला.

    २१ जोडप्यांचा विवाह संपन्न



    बीड जिल्ह्यात विहांग प्रकल्प हा एचआयव्ही बाधित व्यक्ती यांच्यासाठी काम करतो. जिल्ह्यातील एचआयव्हीग्रस्तांना या ठिकाणी त्यांच्या गोळ्या औषधासह त्यांचं मनोबल वाढवून चांगल्या आयुष्याची सुरुवात करण्यास हा प्रकल्प त्यांना आधार देतो. हा प्रकल्प गेल्या सहा वर्षापासून बीड जिल्ह्यात" जुळून येती रेशीमगाठी "या ब्रीद वाक्याने एचआयव्हीग्रस्त वर आणि वधू यांचा विवाह सोहळा पार पडत आहे. दरवर्षी या विवाह सोहळ्याला थोड्या थोड्या प्रमाणात नागरिकांनी देखील सहभाग घेत हा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पाडला जातो. यामध्येच यावर्षी या विवाह सोहळ्यामध्ये तब्बल २१ जोडप्यांचा विवाह झाला, यामध्ये दोन मुस्लिम धर्मीय जोडपी तर बौद्ध आणि हिंदू धर्मीय जोडपी विवाहबद्ध झाली. या सोहळ्यासाठी नातेवाईक आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता ढोल ताशांच्या गजरात या जोडप्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं.
        पहिल्यांदा मुस्लिम समाजातील दोन जोडप्यांचा विवाह सोहळा पार पाडला. त्यानंतर बौद्ध धर्मीय जोडप्यांचा या ठिकाणी सोहळा पार पडला. यानंतर उर्वरित जोडप्यांचा हिंदू धर्माच्या रीतीरीवाजा नुसार हा सोहळा लग्न मंडपात पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या सोहळ्यात एचआयव्हीबाधित असलेल्या वधूवरांना एकत्रित आणून पुढील आयुष्य मोठ्या आनंदात जगण्यासाठी आणि एचआयव्ही सारख्या रोगाने खचून न जाता आपला आयुष्य आपल्या जोडीदार सोबत मोठ्या आनंदात जगण्यासाठी बीडच्या संत महंतांनी यावेळेस आशीर्वाद दिले आहेत, असं राजेश दहिवाळ यांनी सांगितलं.या सोहळ्यामध्ये मोलाचा वाटा ठरला तो महाराष्ट्र उपाध्यक्ष मराठवाडा अध्यक्ष व्यापारी महासंघ जिल्हा अध्यक्ष संतोष सोहनी यांनी या विवाह सोहळ्यासाठी लग्न मंडपात नववधूंना कुटुंब उपयोगी सर्व गोष्टी घेऊन या विवाह सोहळ्या मोठ्या थाटात यांच्या सहभागाने पार पडला आहे. संतोष सोहनी यांनी बीड जिल्ह्यातील अनेक व्यापारी यांचा सहभाग घेऊन या सोहळ्याचा मोठ्या थाटात आयोजन केलं होतं.



    भारतातील पहिलाच सामुदायिक विवाह सोहळा


    बीड जिल्ह्यातील एचआयव्हीग्रस्त वधू-वरांचा हा भारतातील पहिलाच सोहळा बीड जिल्ह्यात पार पडतो. हा सोहळा जगभरात एक आदर्श सोहळा म्हणून पार पडतो. या सोहळ्यासाठी दिल्ली मुंबई सह अनेक राज्यातून मान्यवर व्यापारी आणि संपूर्ण महाराष्ट्रातून ही जोडपी या बीड जिल्ह्यात एकत्र आली आहेत. हा सोहळा पाहून अनेकांचे मन भरून आले आहे. कारण, एचआयव्ही सारख्या रोगावर मात करत आपलं पुढील आयुष्य सुखी जगण्यासाठी ही २१ जोडपी आज नवीन आयुष्यात पदार्पण करत आहेत.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad