अर्थसंकल्प : अजित पवारांनी केल्या 'या' महत्त्वाच्या घोषणा, विरोधक म्हणतात...
राज्याच्या 2024-25 वर्षाच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. यातील एकूण खर्चाच्या 9 हजार 734 कोटी रूपये महसूली तूट अपेक्षित आहे.
या अर्थसंकल्पात काही मोजक्या तरतूदी सोडल्या तर जुन्या प्रस्तावांच्या नव्याने घोषणा करण्यात आल्या आहेत.
हा अर्थसंकल्प उर्वरित चार महिन्यांसाठीचा असेल. लोकसभा निवडणूकीनंतर उर्वरित आठ महिन्यांचा अर्थसंकल्प मांडला जाईल.
या अर्थसंकल्पात 99 हजार 288 कोटींची राजकोषीय तूट आहे.
काय आहेत अर्थसंकल्पातील प्रमुख घोषणा?
अजित पवार यांनी सांगितले की, शिवाजी महाराजांच्या 350 व्या जयंतीनिमित्त छत्रपतींच्या 11 किल्यांना युनेस्कोचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव पाठवला आहे.
- जुलै 2022 पासून शेतीपिकांच्या नुकसानीसाठी 12 हजार 769 कोटी रूपये मदत देण्यात आली.
- शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठा -मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत 7 हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट शेतकऱ्यांसाठी 'मागेल त्याला सौर कृषी पंप' या योजनेअंतर्गत 8 लाख 50 हजार नवीन सौरकृषी पंप
विरोधी पक्षाकडून या अर्थसंकल्पबाबत टीकांची विविध विशेषणे लावण्यात आली. पण सत्ताधारी पक्षातील शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
‘घोषणांचा पाऊस पाडून अजित पवारांनी षटकार मारला असेल पण दिव्यांगांसाठी 2 धावा सुध्दा ते काढू शकले नाहीत’ अशी टीका बच्चू कडू यांनी अजित पवारांवर केली आहे.
दरम्यान, पण हा अर्थसंकल्प आदिवासी, महिला, शेतकरी, कष्टकरी, वंचित या सगळ्यांना सामावून घेणारा अर्थसंकल्प असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ यांनी म्हटलं आहे.
No comments:
Post a Comment