विक्रम गोखलेंवर उपचार सुरु; अफवांवर विश्वास ठेवू नका : - latursaptrangnews

Breaking

Thursday, November 24, 2022

विक्रम गोखलेंवर उपचार सुरु; अफवांवर विश्वास ठेवू नका :



 विक्रम गोखलेंवर उपचार सुरु; अफवांवर विश्वास ठेवू नका :


ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राजेश दामले यांनी विक्रम गोखले यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. बुधवारपासून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत. पण डॉक्टरांचे सध्या प्रयत्न सुरु आहेत.  जसे पुढचे अपडेट्स येतील तसे सर्वांना कळवले जाईल.  त्यांची मेडिकल कंडिशन ही क्रिटीकल आहे, असं विक्रम गोखले यांचे स्नेही राजेश दामले यांनी सांगितलं. 


😇 उदयनराजे भोसलेंचा राज्यपाल, त्रिवेदींवर कडाडून प्रहार :


आदर्श भारताची संकल्पना मांडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जुने कसे झाले? राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावाला आधार काय? शिवरायांचे विचार जुने झाले, तर मुघलांना एकमेव शिवरायांनी विरोध केला होता. लोकांच्या सन्मानासाठी विरोध केला होता. गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी केला होता आणि हे म्हणतात छत्रपतींचा विचार जुना झाला, अशा शब्दात छत्रपती शिवरायांचे थेट वंशज उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या बेताल वक्तव्याचा समाचार घेतला. 


😎 राज्यपाल दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर :


 महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज्यपालांचा आज (24 नोव्हेंबर) आणि उद्या (25 नोव्हेंबर) दिल्ली दौरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज  यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भगत सिंह कोश्यारी यांना दिल्लीत पाचारण केल्याची चर्चा आहे. यावेळी राज्यपाल नेकमं कोणाला भेटणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसंच भाजपचे केंद्रीय नेतृत्त्व महाराष्ट्राच्या राज्यपालांना पदमुक्त करण्याच्या दृष्टीने काही पावलं टाकणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.


🗣️ शिवरायांबद्दल वादग्रस्त विधानावर शरद पवारांची प्रतिक्रिया :


शिवाजी महाराजांवर विधान करून राज्यपालांनी सर्व मर्यादा सोडल्या असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काढलेल्या अवमानकारक उद्गारावर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. शिवाजी महाराजांवर विधान करून राज्यपालांनी सर्व मर्यादा सोडल्या आहेत. काल त्यांनी शिवाजी महाराजांचं कौतुक केलं. पण राज्यातून उमटलेल्या प्रतिक्रियेनंतर त्यांना उशिरा सूचलेलं हे शहाणपण होतं, असं सांगतानाच राज्यपालांच्या विधानाची दखल आता राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनीच घ्यावी. अशा व्यक्तीकडे अशा जबाबदाऱ्या देणं योग्य नाही, असं आवाहन पवार यांनी केलं. 


💧 बिस्लेरी 'टाटा'च्या मालकीची होणार? :


 मागील तीन दशकांपासून अधिक काळ मिनरल वॉटरच्या बाजारपेठेत वर्चस्व असणारी बिस्लेरी कंपनी ही आता 'टाटा' समूहाच्या मालकीची होण्याची शक्यता आहे. टाटा समूह बिस्लेरी कंपनी सहा ते सात हजार कोटींना खरेदी करण्याची शक्यता आहे. लवकरच हा करार पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. 'बिझनेस टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, टाटा समूहातील 'टाटा कंझ्युमर प्रोडक्टस लिमिटेड' बिस्लेरी खरेदी करणार आहे. 

No comments:

Post a Comment