Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    केंद्रीय निवडणूक आयोगाने 'घराणेशाही' मोडीस काढली-हेमंत पाटील

     केंद्रीय निवडणूक आयोगाने 'घराणेशाहीमोडीस काढली-हेमंत पाटील


    केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षासंदर्भात ऐतिहासिक निकाला दिला आहे.या निकालानंतर पक्षातील ठाकरे घराण्याची घराणेशाही,वर्चस्व मोडीस निघाले आहे.केवळ भाषणआरोप-प्रत्यारोप आणि भावनिक आवाहन करून पक्ष चालत नाहीनेतृत्व करण्याची क्षमतासंघटन कौशल्य आणि विशेष म्हणजे पक्षाचा विश्वास नेतृत्वावर असणे आवश्यक आहेअसा टोला इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना शनिवारी लगावला.

    कमकुवत नेतृत्व आणि भ्रष्टाचार यामुळे कशाप्रकारे पक्षाची वाताहात होते याचे उत्तम उदाहरण 'शिवसेनाठरली आहे.स्व.बाळासाहेब ठाकरेंनी ज्या मेहनतीने शिवसेना वाढवलीजनतेमध्ये विश्वास निर्माण केलाजनसामान्यांच्या प्रश्नांचा वाचा फोडून घरोघरी एक विशिष्ट स्थान निर्माण केले होतेते त्यांचा मुलगा आणि नातवाने गमावलेपक्षही गेला आणि जनतेमधील विश्वास तर आधीच उद्धव यांनी गमावला आहेअशात त्यांनी राजकीय संन्यास घ्यावाअसे आवाहन पाटील यांनी केले.

    शिवसेना बळकावली असा टाहो फोडत उद्धव ठाकरे यांनी जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केलापंरतुखरा पक्ष तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच उभा राहीला.शिवसेनेच्या फुटीचा वाद निवडणूक आयोगात पोहचल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे १३ तर ठाकरे यांच्याकडे पाच खासदार होतेठाकरे गटाने सहा खासदारांचा पाठिंबा असल्याचे आयोगाला सांगितले.प्रत्यक्षात चार खासदारांनीच ठाकरेंना पाठिंबा देणारे प्रतिज्ञापत्र सादर केले होते.खासदारांच्या संख्याबळाचा विचार करता,शिवसेनेला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकूण  कोटी  लाख ४५ हजार १४३ मते मिळालीखासदारांच्या पाठिंब्यानुसार शिंदे गटाकडे ७४ लाख ८८ हजार ६३४ मतांचा पाठिंबा असल्याचा निष्कर्ष आयोगाने

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad