Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, 11 उमेदवारांची ऐनवेळी निवडणुकीतून माघार

     



    ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, 11 उमेदवारांची ऐनवेळी निवडणुकीतून माघार


    लातूर: लातूर जिल्ह्यातील रेणापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना ( ठाकरे गट )ला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे नगराध्यक्षपदासह एकूण १६ पैकी तब्बल ११ उमेदवार ऐन निवडणुकीच्या ऐन भरातून माघार घेऊन तटस्थ राहिले आहेत. पक्षाकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याची भावना या उमेदवारांनी व्यक्त केली आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पूर्ण ताकदीने निवडणूक लढवण्याचे आदेश दिले होते, मात्र पक्षांतर्गत अडथळ्यांमुळे हा निर्णय घेण्याची वेळ आल्याचे माघार घेतलेल्या उमेदवारांचे म्हणणे आहे.

    २०१६ मध्ये स्थापन झालेल्या रेणापूर नगरपंचायतीच्या २०१७ च्या पहिल्या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती. आताच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असे चौरंगी लढतीचे चित्र होते. मात्र, ठाकरे गटाच्या ११ उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणुकीत आता वेगळीच रंगत आली आहे. या निर्णयामुळे रेणापूरच्या राजकारणात मोठे वादळ उठले असून, या माघारीचा फायदा कोणाला होणार आणि कोणाला तोटा होणार, याचे गणित आता लावले जात आहे. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, लातूर ग्रामीणचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते धीरज देशमुख यांनी भाजपला आव्हान देण्यासाठी शिवसेनेला कमकुवत केले आहे. विरोधकांचा आरोप आहे की, शिवसेनेच्या ११ उमेदवारांना स्थानिक पातळीवर आपल्या बाजूने वळवून माघार घ्यायला लावणे ही काँग्रेसचीच खेळी आहे
    माघार घेतलेल्या उमेदवारांमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ललिता बंजारा यांचा समावेश आहे. तसेच प्रभाग क्रमांक ३ मधून अनुसया कोल्हे, प्रभाग ५ मधून महेश व्यवहारे, प्रभाग ६ मधून गोविंद सुरवसे, प्रभाग ८ मधून रेखा शिंदे, प्रभाग १० मधून रेहानबी कुरेशी, प्रभाग ११ मधून छाया आकनगीरे, प्रभाग १२ मधून राजन हाके, प्रभाग १३ मधून धोंडीराम चव्हाण, प्रभाग १४ मधून शांताबाई चव्हाण आणि प्रभाग १७ मधून बाबाराव ठावरे यांनी माघार घेतली आहे.
    शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सर्व उमेदवारांना पूर्ण ताकदीने निवडणूक लढवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, पक्षांतर्गत काही अडथळे येत असल्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ आल्याचे माघार घेतलेल्या उमेदवारांनी सांगितले.

    रेणापूर नगरपंचायतीची स्थापना २०१६ मध्ये झाली होती. २०१७ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर तीन वर्षे नगरपंचायतीवर प्रशासकाचा कारभार चालला. आता पुन्हा एकदा निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असे अनेक पक्ष मैदानात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक चौरंगी लढतीची होणार असे वाटत होते.

    मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या ११ उमेदवारांनी ऐन निवडणुकीच्या ऐन भरातून माघार घेतल्याने आता या निवडणुकीत वेगळीच रंगत आली आहे. या माघारीमुळे रेणापूरच्या राजकारणात मोठे वादळ उठण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे कोणाला फायदा होणार आणि कोणाला तोटा होणार, याचे गणित आता राजकीय विश्लेषक घालत आहेत.

    राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, लातूर ग्रामीणचे माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते धीरज देशमुख यांनी भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेला कमकुवत केले आहे. विरोधकांचा असा आरोप आहे की, काँग्रेसनेच शिवसेनेच्या ११ उमेदवारांना स्थानिक पातळीवर आपल्या बाजूने वळवून माघार घ्यायला लावली आहे. ही काँग्रेसचीच खेळी असल्याचे बोलले जात आहे. या सर्व घडामोडींमुळे रेणापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीचे चित्र आता पूर्णपणे बदलले आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad